"गुटख्यातून मिळवलेला पैसा साहित्यसंमेलना साठी वापरू नये" असे विधान श्री. अभय बंग यांनी केले. पुढे, असे पैसे न वापरून "संमेलन `शुध्द' ठेवावे" असेही त्यांनी सुचविले. ही विधाने करण्यापूर्वी श्री. बंग यांनी ती विधाने ज्यांच्या देणग्या बाबत केली होती त्या `माणिकचंद' या `ब्रांड' किंवा त्या उद्योग समुहाचे प्रमुख श्री.धाडीवाल यांनी तो पैसा कसा मिळवला आणि त्यांच्या कोणत्या उद्योगातून देऊ केला होता याची त्यांना कल्पना नसल्याचे कबूल करून मग ती विधाने केली. मग काय विचारता???......
संमेलनापूर्वी कोणत्या ना कोणत्या विषयावरून वादळ उठलेच पाहिजे...ही एक परंपरा ... साहित्याशी संबंध नसलेल्या विषयावरूनच वादळ उठवण्याची दुसरी परंपरा...आणि.... भाष्य करण्यापूर्वी माहिती न मिळवण्याची आपल्या विचारवंतांची तिसरी परंपरा....सर्वच्या सर्व परंपरा यथासांग पार पडल्या!!!! त्यामुळे यंदाचेही साहित्य संमेलन अगदी पारंपारिकरित्या यशस्वी होईल हे नि:संशय!! असो, पण या वादळामुळे पैसा,शुध्दता आणि नैतिकता या साऱ्या बाबत प्रश्न-निकष-व्याख्या आणि संमेलनासाठी [म्हणजे ते शुध्द राहण्यासाठी]`काय वापरावे' याचे नियम तपासण्याची मात्र आवश्यकता निर्माण झाली. या प्रक्रियेत श्री.बंग किंवा तत्सम विचारवंत सहभागी नाही झाले [ विधाने केल्या नंतर त्यावर फेरविचारकिंवा वेगळा दृष्टीकोन न स्वीकारण्याची देखील अशा विचारवंतांची परंपरा असू शकते] तरी देखील या बाबी तपासणे अनिवार्यच आहे.
प्रश्न ४. गुटख्याचा पैसा अशुध्द/अनैतिक असेल तर त्याच्या वितरकाचा, किरकोळ विक्रेत्याचा, पानवाल्याचा पैसा,अशुध्द-अनैतिक ठरतो की नाही?? मग एखाद्या पानवाल्याने देऊ केलेले पैसे संमेलनासाठी स्विकारावे की नाही??
प्रश्न ५. आपल्या दुकानात्तील अनेक वस्तूमध्ये एक गुटखा किंवा सिगारेट ठेवणाऱ्या किराणा व्यापारयाचे पैसे अशुध्द मानावे की नाही?? मानायचे झाल्यास किती प्रमाणात ?? म्हणजे एकूण विकल्या जाणारया २०० वस्तूंमध्ये एक गुटखा विक्री करणारया किराणा व्यापाऱ्याचा शंभर टक्के पैसा अशुध्द होतो असे मानावे, की अर्धाटक्का अशुध्द?? तो टक्का वस्तुंच्या संख्येचा धरावा की,मूल्याच्या ??
प्रश्न ६. भारतातील अनेक मोठी देवस्थाने समाजोपयोगी कारणांसाठी पैसा खर्च करतात. मोठ-मोठ्या देणग्या देतात. त्यांचा पैसा काही आपोआप तयार झालेला नसतो. देवस्थानांकडे जमा झालेला पैसा हा दर्शन घेणारया लोकांनी मूर्ती समोर वाहिलेला किंवा `बड्या' मंडळीनी दागिने-देणग्या स्वरूपात दिलेलाच असतो. त्यात अर्थातच अनेकविध प्रकारची मंडळी असतात, ज्यात अनेकांनी आपले अनैतिक हेतू साध्य व्हावे म्हणून केलेल्या नवसाचे पैसे-वस्तू असतात [उदा. जक्कल-सुतार या खुन्यांनी खून करण्यापूर्वी ते खून आपल्या हातून घडावे यासाठी एका प्रसिध्द देवळात जाऊन नवस केला होता व तो फेडलाही होता] तसेच अनेकांनी आपला काळा पैसा देवस्थानांना दिलेला असतो [उदा. दक्षिण भारतातील एका प्रसिध्द देवस्थानाला काळा पैसा/दागिने दिल्यास उर्वरित काळा पैसा`tax- इन्स्पेक्टर्स' पासून सुरक्षित राहतो अशी श्रद्धा अनेक कृष्ण-धनिका मध्ये आहे म्हणून ते `तशी' सुरक्षा मिळवतात], एकंदरीत कसेही असले तरी देवस्थानाकडे जमा झालेल्या पैशात गुटख्याचा-मद्याचा किंवा त्या व्यापारयांचा, किंवा त्यांच्या जाहिरात एजंसी, जाहिरातीची मोडेल्स वगैरे या ना त्या प्रकारे सम्बंधित,लाभार्थिन्चा पैसा असणारच.मग, देवस्थानांकडून आलेला `तसा' पैसा, देणगी अथवा प्रायोजकत्व हे शुध्द-अशुध्द, नैतिक-अनैतिक यापैकी काय आणि का मानावे??
या साऱ्या प्रश्नांचे उत्तर काहीही असले तरी त्याहून वेगळा आणि महत्वाचा प्रश्न उरतोच ... तो म्हणजे...जो गुटखा [किंवा सिगारेट, मद्य वगैरे कोणतेही अंमली पदार्थ] बनवून किंवा विकून मिळवलेला पैसा अशुध्द-अनैतिक ठरतो...त्याच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱया साहित्यिकाचे साहित्य, किंवा अशा पदार्थाचे सेवन करताना निर्माण झालेले साहित्य अशुध्द ठरते की शुध्द?? अशा पदार्थांचे सेवन करणारया साहित्यिकांनी संमेलनात प्रवेश केल्यास संमेलन `बाटणार' नाही का??
असो...प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य आहेच!! त्यामुळे श्री.अभय बंग किंवा तत्सम व्यक्तींच्या मताचा तेवढा आदर आहेच. त्यात, निर्व्यसनी असूनही सज्जन असलेली जगात जी काही तुरळक मंडळी आहेत, त्यात श्री. अभय बंग, अनिल अवचट हे अग्रणी आहेत हे तर निर्विवाद आहे. तथापि, श्री. बंग यांच्या विधाना नंतर श्री.धाडीवाल यांनी प्रायोजकत्व मागे घेतल्याचे जाहीर केले.. याबाबत त्या मंडळीनी हा "नैतिकतेचा विजय झाला"असे जाहीर केले त्याचे मात्र आश्चर्य वाटले...श्री.धाडीवाल यांनी [प्रायोजकत्व]`नाकारणे' यात संमेलनाची कसली नैतिकता?? नाकारलेल्या उपवर मुलीने तिला नाकाराल्यावर "मला लग्नच करायचे नव्हते आणि`सोज्ज्वळ'’ राहायचे..होते'' असे म्हणण्या सारखे ते वाटले. हे बोलणे म्हणजे `नैतिकतेचा आव' असल्या सारखेच भासते. मराठी मध्ये `आव' याला दुसराही एक अर्थ आहे. अपुरया माहितीवर भाष्य करने आणि त्याच्या परिणामाना `नैतिकतेचा विजय संबोधणे' म्हणजे नैतिकता नव्हे `आव' आहे. अर्थात `आव' कोणत्या अर्थाने हां प्रश्न आहेच!!!